अलिबाग,दि.14: करोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषत: पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठे येथे तात्काळ ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये नामवंत तज्ञ डाॅक्टरांचा समावेश राहणार असून कोविड रूग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, उपचार पद्धती यावर आणि अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेख ठेवणार आहे, आवश्यक तसा सल्लाही देणार आहे. या टास्क फोर्सला ज्येष्ठ आरोग्य तज्ञ व आरोग्य सहसंचालक डाॅ. तात्याराव लहाने यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. या माध्यमातून करोनावर मात करणे व नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे. शासन-प्रशासन करोना विरुद्ध लढताना नागरिकांची सर्व प्रकारे काळजी घेत आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासन आपली जबाबदारी घेत आहे, आपण खबरदारी घ्यावी. घराबाहेर जावू नये, घरातच राहावे,असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगडवासियांना केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!