पाच तासानंतर डबे रुळावर; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी
कळंबोली दि.१०: कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोली यार्ड किलोमीटर संख्या KLMG-22 वर रेल्वे संख्या KTIG-AVC Empty BCN च्या मालवाहू रेल्वे मधील दोन रेल्वेचे डबे रुळावरून आज पहाटे साडेपाच वाजता घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मात्र याची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी मिळून पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर घसरलेले मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावर पूर्ववत आणण्यात यश मिळवले.
कोकण रेल्वे मार्गावर मालवाहून नेणाऱ्या मालगाडीचे दोन डबे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने रुळावरून घसरले. सदरची घटना आज पहाटे साडेपाच वाजता घडली. याबाबतची रितसर तक्रार साडेसहा वाजता पनवेल मधील स्टेशन मास्तर कडे नोंदवण्यात आली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचारी व्यवस्थापनाने यासंबंधी गंभीर दखल घेऊन रेल्वे रुळावरून घसरलेल्या SER-30079303894 , ER-30020261433 या क्रमांकाचे मालगाडीचे डबे पूर्ववत रेल्वे रुळावर आणण्यास प्रयत्न केले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही घसरलेले रेल्वे वेळ डबेवावरून आणून कळंबोलीतील रेल्वे यार्ड मध्ये आणण्यात आले. या महत्त्वाच्या कामगिरी बजावण्यासाठ ADRM/CSMT, अवनीश वर्मा, Sr.DSTE(E) विरेशपत सिंह,ADSTE/PNVL आर के सालवी, DEN(E)/CSMT वाय पी सिंह, ADEN(W)/PNVL ओ पी सिंह, SSE/P.WAY (W)&(E) व ASC/RPF/PNVL, IPF/RPF/PNVL अधिकारी वर्ग सर्व तयारीनिशी उपस्थित होता.