मुंबई दि.14: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली.

उद्या सायंकाळी ८ वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे

मंगळवेडा पंढरपूर मध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील

उद्या संध्याकाळपासून राज्यात १४४ कलम चालू

पुढचे १५ दिवस संचारबंदी

अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे

घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये

आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील

सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

लोकल, बस अत्यावश्यक कर्मचा-यांसाठी सुरु राहतील

जनावराचे दवाखाने सुरु राहतील

मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू राहतील

अधिस्विकृती पत्रकारांना मुभा

हाॅटेल्स, रेस्टांरंट “टेक अ वे” सुरुच राहतील

रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही “टेक अ वे” ची घोषणा

प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ
७ कोटी लोकांना देण्यात येईल एक महिना मोफत 

१० रुपयांची शिवभोजन था ५ रुपयांवर केली
काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला, आता मोफत देणार

रोजी रोटीचा भार नाही कर्तव्य पार पाडत आहे

वयोवृदध, महिला, आदिवासी, निराधार लोकांना २ महिन्यांकरीता हजार रुपये ३५ लाख लोकांना देत आहोत

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणि घरकाम करणा-या लोकांना मदत करीत आहोत

अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये देत आहोत
५ लाख लाभार्थ्यांना फायदा होणार

नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना १५०० रुपये देत आहेत

५ हजार ४०० कोटी रुपये आपण कोव्हिडसाठी वापरत आहोत

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!