हँलो, मी “रक्तदाता” बोलतोय, मला समजले की, आपल्या रुग्णास रक्ताची गरज आहे…मी रक्तदान करण्यास तयार आहे….!  असा “रक्तदाता” नेहमीच रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे.
आजच्या युवापिढीत समज गैरसमज दूर करणे काळाची गरज आहे. आजच्या काळात सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास सहज शक्य होऊ शकते.?
“स्वैच्छिक रक्तदाता” म्हणून आपण जेवढे समाजातील लोकांना जागृत कराल तेवढी माहिती जनमानसात रुजेल. आजकाल सोशल मिडिया, डिजिटल मिडिया प्रिंट मिडिया आदी माध्यमातून समाजात जनजागृती करतांना पाहायला मिळते. आजकाल रक्ताची गरज कुणालाही असो, व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यत मेसेज पोहचिला जातो. यात सामाजिक बांधिलकी जोपासणारे रक्तदात्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज पावतो आपल्या देशात अनेक प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या पण मानवी रक्तासाठी कोणत्याही पर्याय आजपावतो मिळाला नाही. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तथा कारखान्यात तयार होत नसते, हे आजही सर्व सामान्य माणसाला माहीत आहे. पण ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात….! याबाबतीत समाजात  रक्तदानाविषयी सामाजिक बांधिलकी आपल्या जनमानसात रुजणे आवश्यक आहे.
      एकेकाळी रक्त मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भरपूर ठिकाणी संपर्क साधवा लागत होता. पण शासनाच्या मार्गदर्शक ध्येय धोरण तसेच शासकीय पातळीवर जनमानसात पोहोचल्यामुळे अनेक युवक रक्तदान करण्यासाठी पुढे येतात, याचे कारण ही तसेच आहे ..?आपल्या रुग्णांना रक्त मिळणार तरी कोठून?आपणच रक्तदान नाही केले तर रुग्णांना जीवदान मिळणार कसे? ही भावना आतापर्यंत सर्व जनमानसापर्यंत पोहचणे आपली सामाजिक बांधिलकी आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रभातफेरी, स्वैच्छिक रक्तदान शिबिरे, पोस्टर्स स्पर्धा, इ.रक्तदात्यांमध्ये जनजागृतीपर प्रयत्न केला जातो.
            ज्यांच्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होऊन जीव वाचलेला असतो याची जाणीव असलेल्या रुग्णांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आदी यांना स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व पटलेले असते. त्यांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले पाहिजे. रक्तदानाचे फायदे कँन्सर, हार्टअँटक इ.धोका कमी असतो. तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. रस्त्यावर झालेला अपघातात अतिरक्तस्राव झालेला व्यक्ती, प्रसूती वेळी अथवा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झालेल्या महिलेला वेळीच रक्त मिळाले तर नक्कीच त्यांचे प्राण वाचविल्याचे “रक्तदाता” म्हणून समाधान मिळते. या व्यतिरिक्त  अँनेमिया, शस्त्रक्रिया, कर्करोग आदी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी निश्वासर्थपणे स्वैच्छिक रक्तदाता म्हणून रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. याच बरोबर थँलेसेमिया, सिकलसेल यासारखे दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या काही बालकांमध्ये जन्मजात रक्त तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प कमी असते. त्यामुळे त्यांचे योग्य निदान करून वैद्यकीय सल्लानुसार रक्तपुरवठा केला जातो. अशा रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहे. त्यांना महिन्यातून किमान दोन वेळेस तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्तपुरवठा केला जातो. अशा रुग्णांना वेळो वेळी रक्त द्यावे लागते, यासाठी आपली सर्वाची सामाजिक बांधिलकी नात्याने नैतिक जबाबदारी आहे. यासाठी आपण रक्तदान शिबिर अथवा रक्तकेंद्रात जावून शासन मान्यता प्राप्त रक्तपेढी/रक्तकेंद्रात आपले “रक्तदाता” म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. यासाठी आपण कोणत्याही शासन मान्यताप्राप्त रक्तपेढी/रक्तकेंद्र येथून रक्त घेणे कधीही फायदेशीर आहे.
              रक्तदाता म्हणून आपले वय 18 -60 वर्षेपर्यंत व वजन 48 किलो पेक्षा जास्त तसेच शरीरातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाण(12.5% वर) असलेल्या निरोगी व्यक्ती रक्तदान करु शकता. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रक्तकेंद्रात अथवा रक्तदान शिबिरात विविध तपासणी करून रक्तसंकलन केले जाते. रक्ताच्या दिशानिर्देश नुसार सर्व चाचणी(एड्स, कावीळ अ,ब आणि गुप्तरोग, मलेरिया, रक्तगट, क्रासमँच इ) केल्यानंतरच रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा केला जातो. आपण केलेले स्वैच्छिक रक्तदान यासाठी शासन नियमानुसार दोन वर्षातून एकदा मोफत रक्त मिळते. याचा लाभ आपण घेऊ शकता. रक्त हे जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही (रक्तदान केल्यापासून फक्त 35 दिवस) यासाठी रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते.
     14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एवढेच आपल्याला आवाहन करण्यात येते की, स्वैच्छिक रक्तदान ही काळाची गरज ओळखून आपल्या जवळच्या शासन मान्यता प्राप्त रक्तपेढीत आपण जबाबदार भारतीय नागरिक “रक्तदाता” म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासून निश्वासर्थपणे स्वैच्छिक रक्तदान करावे. रक्तदानानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचना नूसार रक्त व रक्ताचे विघटन करून प्लाझ्मा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स ,क्रायोप्रेसिपिटेडआदी विघटन तयार करुन वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना पुरवठा केला जातो.  यासाठी आपले स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते.

शासनाचे घोषवाक्य

“Give Blood, give plasma,share life, share often”.
” रक्त द्या, प्लाझ्मा द्या, वारंवार द्या,एखाद्याच्या जीवनाचा हिस्सा बना !

   “14 जून “1868 रोजी जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीनिमित्त “जागतिक रक्तदाता दिन” म्हणून जगभरात साजरा केला जातो. एबीओ रक्तगट प्रणालीचा शोध घेऊन आरोग्य विज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. सोशल माडिया, व्हाट्सएपच्या ग्रुप च्या माध्यमातून “रक्तदाता व्हाट्सएप ग्रुप” तयार करून स्वैच्छिक रक्तदान चळवळ यशस्वीपणे  रुजविता येऊ शकते.
              जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने 2005 मध्ये पहिल्यांदा “रक्तदाता दिन” आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वैच्छिक रक्तदान चळवळ जनजागृतीसाठी युवाशक्तींनी  पुढे येणे काळाची गरज आहे. देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान कमी प्रमाणात आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वैच्छिक रक्तदान मोहिम राबवून आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवून देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात हातभार लावू शकता. मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी. 14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने समाजात/ रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती  व्हावी एवढाच उद्देश !

लेखन, संपादन: हेमकांत सोनार, मनोज शिवाजी सानप, रक्तपेढी तंत्रज्ञ,                                                                      जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग
जिल्हा शासकीय रक्तपेढी,
जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!