मुंबई दि.२३: पुढील पाच दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिवृष्टीसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २४ ते २६ जुलै दरम्यान अत्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ जुलैपासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता “अत्यंत शक्य” असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे दिवस ‘रेड अलर्ट’ किंवा ‘धोक्याचा’ इशारा देणारे आहेत. या कालावधीत अतिवृष्टीबरोबरच काही ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडू शकतात.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील २४ ते २६ जुलै दरम्यान “जोरदार ते अतिजोरदार” पावसाचा इशारा देण्यात आला असून, स्थानिक पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धुळे जिल्ह्यात तुरळक वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: २४ ते २६ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा “रेड अलर्ट”
मुंबई, ठाणे, पालघर: २४ ते २६ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस
धुळे, वीजासह हलका ते मध्यम पाऊस

हवामान विभागाने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नद्या, नाले भरून वाहण्याची शक्यता असून, डोंगरकपारी व भूस्खलन प्रवण भागात विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
(अधिकृत हवामान विभागाचा इशारा २३ जुलै रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्ध करण्यात आला आहे.)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!